Friday, March 22, 2019

रात्र वैर्‍याची

पहाटेचे 2.13 मिनिट झालेत
जगजीत सरांची गझल
चिठी ना कोई संदेश ...
ऐकत ऐकत.....

रात्रीची भुतं पुन्हा मानगुटीवर बसलीत
हा या वेळेचा परिणाम आहे की ,
गाण्याचा नाही माहीत ,
भूतकाळ आठवतोय
उगाचच,
काही चेहरे आठवतातयत
काही निघून गेलेले, काही सोडून गेलेले
काही मुद्दामूण निघून गेलेत
मला टाळण्यासाठी,
त्यांना आठवत देखील नसेल मी,

काही मात्र माझे आवडणारे ,त्यांना मी आवडत होतो असे पण आहेत लिस्ट मध्ये,

पप्पा,आत्या,काही मित्र,
मैत्रीण देखील,
जे मुद्दामून निघून गेलेत ,त्यांची का
आठवण यावी बर,
त्यांचा मनाने आलेत आणि त्यांचा मनाने निघून गेलेत
थांबवण्याचा विषयच नव्हता,
बळजबरी नाही करू शकत आपण कोणावर
ती त्यांची मर्जी,
पण आज का आठवावेत ते,
कारण ते जेव्हा सोबत होते ना ,
त्यांचा सहवास हवाहवासा वाटत होता
त्यांना देखील,
पण कुठे माशी शिंकली नाही माहीत
त्यांनी जस काढलं ना मला त्यांचा आयुष्यातून,
त्यांना देखील मी विसरायचं ठरवलंय आता,
हो कुठेतरी सोडाव्याच लागतात,
काही आठवणी ,नसता जड होत डोकं
आणि ती भूत काढतात डोकं
आणि खातात मनाला राहून राहून....
आणि ते जे ज्यांना जायचे नव्हते ते
नियतीने नेलं त्यांना दूर केलं माझ्यापासून
आणि जगापासून सुद्धा ,त्यांचा प्रिय व्यक्तीपासून पण
सुद्धा, त्यांना नव्हतं जायचं तरी गेलेत ते ...


मी तर फक्त आठवण काढू शकतो ,
आसव गाळू शकतो ,
ते जिथे गेले तिथे सुखाने राहू दे
म्हणून प्रार्थना करू शकतो
या व्यतिरिक्त बाकी काही नाही  ....


No comments:

Post a Comment

Name-
Email address-
Message-