Sunday, May 12, 2019

आठवणींचा दोर कितीवेळा तानायचा
पुरे कर आता तुझा मैत्रीचा बहाणा


जन्मोजन्मी साथ देण्याचे दिले होतेस तू वचन
पदोपदी भेटला फक्त विरहाचा क्षण
तुटलेल काळीज मी किति वेळा   शिवायच
आणि शिवलेल काळीज किती वेळ टिकायच ,

ते कारण -नको सांगूस तू
वेळ नाही ,याचं
तुझी प्रायोरिटी बदलिली आता,
हे कोण सांगायचं...

तेव्हा तासन तास बोलायला
वेळ होता तुझ्याकडे,
आता काम वाढलं ऑफिस मध्ये,
हे का मला पचायच,

वेळ नाही बदलत,हे खरं आहे.
विचार बदलतात,
तुझे माझे,
हे मात्र खरं आहे.

चल जाऊदे जे झालं गेलं,
मी सुखी आहे आता,
तुझा शिवाय ,
मला फक्त हे सांगायचं होत..


No comments:

Post a Comment

Name-
Email address-
Message-