Monday, April 8, 2019

ऋतू येत आहेत तसे जात आहेत,
अशी ओढ वगैरे नाही आता,
आणि फरक देखील नाही पडत,
कोण येतेय जातंय,
कोणाशी बोलायची पण इच्छा होत नाही ,.

मन खायला उठतय वगैरे नाही,
पण रस नाही राहीला,
नवीन करायची उर्मी आहे,
पण ती उत्कंठता नाहीये,

आणि आता कोणाशी नात ठेवावं,
किंवा वाढवावं अस पण वाटत नाही,
तेव्हढापुरत तेवढं ठीक आहे
जास्त डीप मध्ये नको वाटतय,

एवढं असून देखील,
फोन मात्र पुन्हा-पुन्हा चेक करत असतो

नेट बंद करून चालू करत असतो,
उगाच व्हाट्सएप,इंस्टा,आणि मेसेंजर,
ला चेक करत असतो,
काय माहीत कस काय,
आणि कोणी स्वतःहून,
ओढ दाखवली की दडपण येतंय ,
कसलं तरी,
Unknown नंबर वरचा कॉल आला
ना धडकी भरते,
उगाचच,
कोणाचं कर्ज नाही डुबवल मी कॉल न
उचलायला,
पन काय माहीत अस का होतंय,

अस पण नाहीये की ,
कामात मन नाहीये,
सगळं ओके वालच आहे
सगळं रुटीन पण ...
पण...
पण...

No comments:

Post a Comment

Name-
Email address-
Message-